मुख्य बातमी

मनोज जरांगेंनी शाहू महाराजांचा मान राखला

महाराज म्हणाले, सरकारला तुमचा शब्द मानावाच लागेल!

जालना : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. जालन्यातील आंतरवाली सराटी  येथे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आमरण उपोषणाला बसले आहेत. राज्यभरात मराठा आरक्षण आंदोलनाला हिंसक वळण लागलेलं आहे. अशातच आज (मंगळवार, 31 ऑक्टोबर 2023) कोल्हापूरचे श्रीमंत शाहू महाराज यांनी  आंतरवाली सराटीत उपोषणस्थळी जाऊन मनोज जरांगेंची भेट घेतली. त्यावेळी शाहू महाराजांना शब्द देत, राजांचा मान राखून दोन दिवस पाणी पिणार, दोन दिवसांत आरक्षण मिळालं नाहीतर पुन्हा पाणी सोडणार, असं म्हटलं आहे.

राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला असताना राज्यभरातून अनेक नेते श्रीमंत शाहू महाराजांनी आंतरवली सराटी येथे जाऊन मनोज जरांगे-पाटील यांची भेट घेतली. छत्रपती घराण्यातील माजी खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी भेट घेतल्यानंतर आज कोल्हापूरचे श्रीमंत शाहू महाराज मनोज जरांगे-पाटील यांची भेट घेतली. त्यावेळी शाहू महाराजांनी सरकारला आपला शब्द ऐकावाच लागेल, असं स्पष्टच सांगितलं. तसेच, तब्येतीची काळजी घेण्याची विनंती मनोज जरांगेंना शाहू महाराजांनी केली.

दरम्यान, संभाजीराजे छत्रपतींनी मराठा आंदोलक मनोज जरांगेंशी फोनवरुन चर्चा केली. तसेच, जरांगेंच्या तब्ब्येतीची संभाजीराजेंनी चौकशीही केली. मनोज जरांगेंना निदान पाणी तरी घ्यावं अशी विनंतीही संभाजीराजे छत्रपतींनी केली. तसेच, काळजी घेण्याचंही आवाहन संभाजीराजेंनी केलं. यापूर्वी आंतरवाली सराटीत जात संभाजीराजे छत्रपती यांनी मनोज जरांगेंची भेट घेतली होती.

Advertisements
Advertisements
छत्रपती संभाजीराजे यांनी मनोज जरांगे पाटील यांची फोन वरून विचारपूस केली. आपण मराठा आरक्षण आंदोलनाचे नेतृत्व करत आहात, आपण आपल्या तब्येतीची काळजी घेणे आवश्यक आहे. आपण उपोषण करत आहात ठीक आहे परंतु आपण पाणी प्यावे अशी विनंती करत असल्याचे छत्रपती संभाजीराजे यांनी म्हटलं आहे.

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button