महाराष्ट्रमुख्य बातमी

चालकाचं नियंत्रण सुटलं अन् बस पुलावरुन थेट नदीत कोसळली

कोल्हापूर: गोव्याहून मुंबईकडे कऱ्हाडमार्गे जाणाऱ्या एका खाजगी ट्रॅव्हल्स बसचा पुलावरून कोसळून अपघात झाला आहे. ही घटना आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास कोल्हापुरातील शाहूवाडी तालुक्यात असलेल्या वारणा नदीवरील कोकरूड कोणावर घडली आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झालेली नसून बसचे किरकोळ नुकसान झाले आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील वारणा नदीवरील कोकरूड पुलावरून आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास गोव्याहून मुंबईकडे वाया कराड मार्गे पोलो या खाजगी कंपनीची ट्रॅव्हल्स बस प्रवाशांना घेऊन निघाली होती. काल पाऊस पडल्याने रस्ता निसरडा झाला होता. शिवाय आज या परिसरात मोठ्या प्रमाणात धुके असल्याने समोरचे स्पष्ट देखील दिसत नव्हते. सकाळी आठ वाजता ही बस प्रवाशांना घेऊन या पुलावरून जात असताना अचानक चालकाचा बस वरील ताबा सुटला आणि बस थेट वारणा नदीच्या पात्रात कोसळली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

सुदैवाने नदीला पाणी कमी असल्याने ही बस नदीपत्रात कोरड्या भागात जाऊन थांबली. यावेळी बसमधील प्रवासी त्वरित बाहेर पडले. दरम्यान, ही घटना घडताच परिसरातील नागरिकांनी येथे गर्दी केली होती. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून किरकोळ जखमींना उपचारासाठी जवळच्या आरोग्य केंद्रात हलवण्यात आले आहे. तर बसचे देखील किरकोळ नुकसान झाले आहे.

Advertisements
Advertisements

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button