सेलू : तालूक्यात झालेल्या आवकाळी पावसामूळे शेती पिकांचे प्रचंड नूकसान झाले असून हातातोंडाशी आलेला घास आवकाळी पावसामूळे हिरावून घेतला आहे. तालूक्यात सोमवारी (ता.०६) रात्री अकरा वाजेच्या सूमारास वादळी वार्यासह विजेच्या कडकडाटासह पावसाच्या सरी कोसळल्या पावसामूळे गहू, ज्वारी पिकांचे मोठ्या प्रमाणात नूकसान झाले.
तर कापणी केलेले हरभरा पिकांच्या गंजीवरील ताडपत्र्या वार्यामूळे उडून गेल्याने हरभरा पिकांच्या गंजी भिजल्या आहेत. अगोदरच मेटाकूटीस आलेल्या शेतकर्यांना असा निसर्गााच्या प्रकोपाचा सामना करावा लागत आहे. हरभरा, गहू, ज्वारी पिकांना अगोदरच उतारा कमी येत असतांना असा असमानी सकटांचा सामना शेतकर्यांना करावा लागत आहे.
एकीकडे सरकार मोठ्या प्रमाणात खत, रसायनिक औषधी, बियाणे यांच्या किंमतीत वाढ करत आहे. मात्र शेती मालास कमी भाव असल्याने शेती करणे परवडत नसून त्यामध्ये असा आस्मानी सूलतानी संकटाचा सामना शेतकर्यांना करावा लागत असून शासनस्तरावरून मदत मिळण्याची मागणी शेतकर्यांतून होत आहे.
Advertisements
Advertisements
Follow Us