मुंबई : एक टी कामगार संघटनेने ११ सप्टेंबरपासून मुंबईतील आझाद मैदानात बेमुदत उपोषणाची हाक दिली आहे. त्यामुळे गणेशोत्सव आणि दिवाळीच्या उत्सवावर एस टी कर्मचार्यांच्या संपाचे सावट निर्माण झाले आहे.
तत्कालीन परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी २०१६ ते २०२० या कालावधीतील चार हजार ८४९ कोटी रुपयांची एकतर्फी पगारवाढ घोषित केली. यातील केवळ एक हजार ८४९ कोटींचेच वाटप केले गेले, असे संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांचे म्हणणे आहे.
या मागण्यांच्या पूर्ततेसाठी ११ सप्टेंबरपासून बेमुदत उपोषणाची हाक देण्यात आली आहे. १३ सप्टेंबरपर्यंत महामंडळाने आणि सरकारने मागणी पूर्ण केली नाही, तर प्रत्येक जिल्ह्यात ‘काम बंद’ आंदोलन करण्यात येईल, असे शिंदे यांनी सांगितले. दरम्यान, कामगार संघटनेने उपोषणाची नोटीस दिली असून, याबाबत चर्चेतून तोडगा काढण्यात येईल, असे महामंडळाकडून सांगण्यात आले.
तत्कालीन परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी २०१६ ते २०२० या कालावधीतील चार हजार ८४९ कोटी रुपयांची एकतर्फी पगारवाढ घोषित केली. यातील केवळ एक हजार ८४९ कोटींचेच वाटप केले गेले, असे संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांचे म्हणणे आहे.
मागण्यांच्या पूर्ततेसाठी ११ सप्टेंबरपासून बेमुदत उपोषणाची हाक देण्यात आली आहे. १३ सप्टेंबरपर्यंत महामंडळाने आणि सरकारने मागणी पूर्ण केली नाही, तर प्रत्येक जिल्ह्यात ‘काम बंद’ आंदोलन करण्यात येईल, असे शिंदे यांनी सांगितले. दरम्यान, कामगार संघटनेने उपोषणाची नोटीस दिली असून, याबाबत चर्चेतून तोडगा काढण्यात येईल, असे महामंडळाकडून सांगण्यात आले.