क्राईममुख्य बातमी

रागात हातपाय तोडून खून, चूक कळताच पेटवलं

जालना : घरात सतत त्रास देतो म्हणून जन्मदेते वडील, भाऊ आणि पोटचा मुलगा अशा तिघांनी संगनमत करून एकाला जिवानिशी संपवल्याचा धक्कादायक प्रकार जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातील शिरनेर या गावात घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली असून या प्रकाराने रक्ताच्या नात्याला काळीमा फासला आहे.

पोटच्या मुलाला जिवानिशी मारून त्यानंतर त्याचे प्रेत जाळून टाकले जात असल्याची पक्की माहिती अंबड पोलीसांना गोपनीय खबऱ्यामार्फत मिळाली होती. मिळालेल्या माहितीवरून अंबड पोलीसांनी ताबडतोब तपासाची चक्रे फिरवली आणि घटनास्थळ गाठले. तिथे गेल्यावर जे दिसले आणि समजले त्यावरून पोलिसही चक्रावले.

जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यांतील शिरनेर येथील नारायण वैद्य यांचा मुलगा धर्मराज हा नेहेमी घरात वाद घालायचा. त्याच्या या स्वभावाला घरातील सगळेच कंटाळले होते. घरच्यांनी त्याला कित्येकदा समजावून सांगितले, रागावून पाहिले पण त्याचा स्वभाव काही बदलेना.

Advertisements
Advertisements

१५ मे रोजी म्हणजे सोमवारी धर्मराज वैद्य याने घरात वाद घालायला सुरुवात केली. पण काल नशिबाचे फासे नेमके उलटे पडले आणि वाद हा वाढत हाणामारीपर्यंत गेला. त्याच्या त्रासाला कंटालेल्या वडील नारायण चिमाजी वैद्य, भाऊ कर्णराज नारायण वैद्य आणि मुलगा निर्गुन धर्मराज वैद्य यांनी संगनमतकरून धनराजला शेतात नेवून काठीने हातावर, पायावर मारून हातपाय मोडून त्याचा खून केला.

भानावर येताच आपण काय केले हे तिघांच्या लक्षात आल्यावर त्यांनी पुरावे नष्ट करण्यासाठी धर्मराजचे प्रेत उचलले, लाकडाचे सरण तयार केले आणि त्यावर प्रेत टाकून पेटवून दिले. त्यात धर्मराजचा देह १०० टक्के जळून खाक झाला. पण या प्रकरणाला वाच्यता फुटली आणि पोलिसांना माहिती मिळाली.

पोलीसांनी या प्रकरणाचा वेगाने तपास केला आणि तिन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांनी खाक्या दाखवताच तिघांनी गुन्हा कबूल केला आहे. पो.उप.निरि.एम.बी.स्कॉट यांच्या फिर्यादीवरून अंबड पोलीस ठाण्यात कलम ३०२, २०१, ३४ भादवीप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक शिरीष हुंबे हे करीत आहेत. त्रास देणाऱ्या मुलाचा शेवट जन्मदाता बाप, सख्खा भाऊ व पोटच्या मुलानेच केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Back to top button