महाराष्ट्र

अजिंठा-वेरुळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘वल्ली’ सिनेमाला पुरस्कार

जागतिक स्तरावर निवड झालेला एकमेव चित्रपट

संभाजी नगर : संभाजी नगर या ऐतिहासिक शहरात नामांकित ९वा अजिंठा-वेरुळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव नुकताच पार पडला. आशुतोष गोवारिकर यांच्या उपस्थितीत महोत्सवाचा समारोप झाला. ‘वल्ली’ या मराठी सिनेमाची ‘Indian Competition’ मध्ये अधिकृतरित्या निवड झाली होती. या महोत्सवामध्ये ‘वल्ली’ सिनेमाला तीन पुरस्कारांनी सन्मानित केलं गेलं आहे. दोन्ही प्रमुख कलाकारांना देवा गाडेकर आणि वर्षा सुनील अजिथ यांना “सर्वोत्कृष्ट अभिनय”साठी सन्मानित करण्यात आलं.

त्याशिवाय पुण्यात १८ ते २५ जानेवारी दरम्यान होणाऱ्या २२व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (PIFF २०२४) ‘वल्ली’ चित्रपट, ‘संत तुकाराम’ सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट स्पर्धा या अंतर्गत निवडला गेला आहे.

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Back to top button