देश -विदेशमुख्य बातमी

गौरीकुंडमध्ये दरड कोसळल्याने अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याची भीती, दुकानंही गेली वाहून

केदारनाथ यात्रा मार्गावरली गौरीकुंड या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर दरड कोसळल्याचं वृत्त समोर आलं आहे. यामुळे ढिगाऱ्याखाली अनेकजण गाडले गेले आहेत. तर दुकानंही मंदाकिनी नदीत वाहून गेली आहेत असं समजतं आहे. उत्तराखंड येथील रुद्रप्रयाग या ठिकाणी पूर आल्याने आणि दरड कोसळल्याने १३ लोक बेपत्ता झाले आहेत. गुरुवारी रात्री प्रचंड पाऊस पडला. त्यानंतर या ठिकाणी असलेली तीन दुकानंही वाहून मंदाकिनी नदीत गेली असंही सांगण्यात येतं आहे.

केदारनाथ यात्रा मार्गावर असलेल्या गौरीकुंड या ठिकाणी ही घटना घडली आहे. जिल्हा कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार १३ लोक बेपत्ता झाले आहेत. त्यापैकी १२ लोकांची ओळख पटली आहे. या १२ जणांमध्ये ३ वर्षे ते १४ वर्षांच्या वयातील पाच मुलांचाही समावेश आहे. रात्री उशिरा या ठिकाणी मदत आणि बचावकार्य सुरु करण्यात आललं आहे. ढिगाऱ्याखाली अनेक लोक आत्ता आहेत. SDRF ने दिलेल्या माहितीनुसार आत्तापर्यंत १३ जण बेपत्ता आहेत यामध्ये नेपाळी आणि स्थानिक नागरिकांचा समावेश आहे.

घटनास्थळी उपस्थित असलेले पोलीस अधिकारी विमल रावत यांनी सांगितलं की प्रचंड पाऊस पडत असल्याने बचाव कार्यात अडचणी येत आहेत. तसंच काही भागांमध्ये दरड काही ठराविक अंतराने कोसळते आहे त्यामुळेही बचाव कार्यात अडथळे येत आहेत. मुसळधार पावसामुळे मंदाकिनी नदीला पूर आला आहे.

Advertisements
Advertisements

आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी दलीप सिंह रजवार यांनी सांगितलं की जिल्हा प्रशासनाची टीम, आपत्ती व्यवस्थापन विभाग, पोलीस, SDRF, NDRF ही सगळी पथकं घटनास्थळी उपस्थित आहेत. डोंगराचा भाग कोसळल्याने तीन दुकानांचं मोठं नुकसान झालं आहे. जे १० ते १२ लोक या ठिकाणी होते त्यांचाही शोध सुरु आहे.

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button