परभणी

परभणीतून बदली झालेल्या उपजिल्हाधिकाऱ्यांना अजून का रिलिव्ह केले नाही

परभणी 

विशेष..
 
उपजिल्हाधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात बदल झाल्या परंतु अनेक उपजिल्हाधिकारी नेमणुकीच्या ठिकाणी हजर झाले नाहीत परभणी जिल्ह्यातील उपजिल्हाधिकारी देखील नेमणुकीच्या ठिकाणी अजून हजर झाले नाहीत …….त्यांना परभणीतून का रिलिव्ह केले नाही हा प्रश्न अजूनही अनुत्तरीत करतो आहे ….
परभणीचे निवडणुक उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड यांची बदली करण्याचे आदेश जारी झाले होते…. परंतु अद्याप तरी गायकवाड परभणीलाच ठाण मांडून आहेत….
तातडीने कार्यमुक्त करावी असे आदेश असताना देखील वरिष्ठांनी त्यांना का पाठीशी घातले असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो आहे…
आणखी गंभीर बाब म्हणजे 
मनासारखी पोस्टिंग न मिळाल्याने राज्यातील तब्बल 30 उपजिल्हाधिकारी यांनी दोन महिन्यापासून पोस्टिंग स्वीकारलेली नाही. यातील बरेचसे अधिकारी अजूनही मंत्रालय आणि मंत्र्यांच्या दालनामध्ये फेऱ्या मारताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आणि आपत्तीग्रस्त नागरिकांना दिलासा देण्यासाठी अनेक ठिकाणी प्रशासन कमी पडताना पाहायला मिळत आहे.
 
बदली झालेल्या ठिकाणी गेल्या दोन महिन्यांपासून अनेक महसूल अधिकारी अद्यापही रुजू झाले नाहीत अशा सर्व अधिकाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करत विभागीय आयुक्त पातळीवर चौकशी करण्याचे आदेश राज्याचे महसूल मंत्री यांनी दिले असल्याचे मध्यंतरी सांगण्यात आले होते परंतु अजूनही त्यावर कारवाई झाली नाही….
 
उपजिल्हाधिकाऱ्यांची नेमणूक, मात्र अधिकारी हजर नाहीत
 
गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामध्ये शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने तात्काळ पंचनामे करण्याच्या आदेश दिले. मात्र हे आदेश पाळण्यासाठी अनेक जिल्ह्यांमध्ये उपजिल्हाधिकारी हजरच नाहीत अनेकांच्या नेमणुका झाल्यात मात्र ते चार्ज घेत नसल्याचं दिसून येते..

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button