देश -विदेशमराठवाड़ामहाराष्ट्र

‘एच ३एन २’बाबत न घाबरण्याचा डॉक्टरांचा सल्ला

छत्रपती संभाजीनगर : ‘एच ३ एन २’ विषाणूने देशाचे लक्ष वेधले असले तरी, छत्रपती संभाजीनगर आरोग्य विभागातील चार जिल्ह्यांमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून आतापर्यंत केवळ १४ रुग्ण विषाणुबाधित असल्याची नोंद झाली आहे. मात्र, तरी घाबरण्याचे कारण नाही, योग्य काळजी घ्या, असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.

छत्रपती संभाजीनगर विभागातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी व हिंगोली या चार जिल्ह्यांमध्ये फेब्रुवारीत ११ व मार्चमध्ये आतापर्यंत ३ रुग्ण हे एच ३ एन २ विषाणुबाधित असल्याची नोंद झाली आहे. मात्र ही संख्या कितीतरी पटींनी जास्त असू शकते, अशी शक्यता तज्ज्ञांमधून व्यक्त केली जात असली तरी, या विषाणुमुळे गंभीर गुंतागुंत होण्याचे प्रमाण खूप कमी असल्याचेही तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.

या संदर्भात शहरातील फिजिशियन डॉ. अनंत कुलकर्णी म्हणाले, सध्या विषाणुबाधित व्यक्तींची संख्या खूप जास्त आहे आणि घरोघरी असे रुग्ण दिसून येत आहे. त्याचवेळी घरामध्ये एका व्यक्तीला विषाणूची बाधा झाली की इतरांनीही बाधा होत असल्याचे दिसून येत आहे. या रुग्णांची चाचणी होत नसली हे बहुतांश रुग्ण एच ३ एन २ विषाणूने बाधित असू शकतात. मात्र महत्त्वाचे हे आहे की बहुतांश रुग्णांना विषाणूचा संसर्ग असल्याचे गृहित धरले तरी, त्यामुळे गंभीर गुंतागुंत होण्याचे प्रमाण नगण्य आहे आणि म्हणूनच घाबरण्याचे कारण नाही, असेही डॉ. कुलकर्णी म्हणाले.

Advertisements
Advertisements

दाखल करण्याची वेळ कमीच

दरवर्षीच फेब्रुवारी-मार्च महिन्यामध्ये विषाणूजन्य आजार वाढतात आणि प्रत्येक वर्षी वेगवेगळे विषाणूंचे वर्चस्व असते. तसे या वर्षी ‘एच ३ एम २’चे वर्चस्व आहे. मात्र तरीदेखील ज्यांच्या ऑक्सिजनची पातळी कमी होत आहे किंवा इतर गंभीर त्रास होत आहे, त्यांनाच दाखल करण्याची वेळ येत आहे. इतर सर्वांवर बाह्य रुग्ण विभागातील उपचार पुरेसे ठरत आहे, याकडे घाटीच्या औषधनिर्माणशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य यांनी ‘मटा’शी बोलताना लक्ष वेधले.

अशी घ्या काळजी

  • गर्दीत व्याधीग्रस्तांनी मास्क वापरणे गरजेचे
  • हात वारंवार स्वच्छ धुणे सर्वांसाठीच ठरते उपयुक्त
  • कुलरचे वाळे किंवा एसीचे फिल्टर स्वच्छ करुन वापरावे

‘एच ३ एन २’मुळे काही आठवड्यांपर्यंत खोकल्याचा किंवा इतर त्रास होऊ शकतो. मात्र गंभीर गुंतागुंत होण्याची किंवा रुग्णाला दाखल करण्याची वेळ कमी येत आहे. त्यामुळे नवीन विषाणू प्रकाराला घाबरुन जाण्याचे कारण नाही.-डॉ. अनंत कुलकर्णी, फिजिशियन

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Back to top button