अधिवेशनाचं सूप वाजलं, सकाळी ८ वाजताच्या ठोक्याला दादा मंत्रालयात, खोळंबलेली कामे निकाली
मुंबई : विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन शुक्रवारी रात्री उशीरा संस्थगित झाल्यानंतर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी (5ऑगस्ट) सुट्टीच्या दिवशी सकाळी लवकर आठ वाजता मंत्रालयात येऊन अधिवेशनकाळात नागरिकांकडून प्राप्त झालेल्या पत्रांचा आढावा घेतला तसेच कार्यवाहीबाबत संबंधीत अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. तत्पूर्वी महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत बैठक घेऊन चर्चा केली.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे तत्पर निर्णयांसाठी, त्यांच्याकडील नस्त्यांचा तसेच कामांचा वेळेवर निपटारा करण्यासाठी ओळखले जातात. विधिमंडळ अधिवेशनकाळात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटण्यासाठी, निवेदने व पत्रे देण्यासाठी नागरिकांची गर्दी होत होती. परंतु विधीमंडळ कामकाजातील व्यस्ततेमुळे सर्वच पत्रे-निवेदनांवर कार्यवाही होऊ शकली नव्हती.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे तत्पर निर्णयांसाठी, त्यांच्याकडील नस्त्यांचा तसेच कामांचा वेळेवर निपटारा करण्यासाठी ओळखले जातात. विधिमंडळ अधिवेशनकाळात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटण्यासाठी, निवेदने व पत्रे देण्यासाठी नागरिकांची गर्दी होत होती. परंतु विधीमंडळ कामकाजातील व्यस्ततेमुळे सर्वच पत्रे-निवेदनांवर कार्यवाही होऊ शकली नव्हती.
अधिवेशाचे सूप वाजले, हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरपासून
जवळपास अडीच आठवडे चाललेल्या राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचे शुक्रवारी सूप वाजले. विधिमंडळाचे पुढील हिवाळी अधिवेशन नागपूर येथे ७ डिसेंबर, २०२३ पासून सुरू होईल, अशी घोषणा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली.
१७ जुलैपासून सुरू झालेले पावसाळी अधिवेशन शुक्रवारी संस्थगित करण्यात आले. पावसाळी अधिवेशनात एकूण १३ दिवस कामकाज चालले. त्यात १०९ तास २१ मिनिटे प्रत्यक्ष कामकाज झाले. रोजचे सरासरी कामकाज ८ तास २४ मिनिटे झाले. वाया गेलेला वेळ हा फक्त २० मिनिटांचाच आहे. अधिवेशनात सभागृह तहकूब करण्याची वेळ जवळपास आलीच नाही.