महाराष्ट्र

भारत गौरव रेल्वेतील ४० प्रवाशांना विषबाधा

चेन्नईहून पुण्याकडे येत असलेल्या भारत गौरव ट्रेन मधील ४० प्रवाशांना अन्नातून विषबाधा झाली आहे. सर्व ४० प्रवाशांना पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात येणार होते.  रेल्वे प्रशासनाकडून तशी माहिती ससून रुग्णालयाचा देण्यात आली होती. पण, सर्व प्रवाशांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.

चेन्नईहून पुण्याकडे येणाऱ्या भारत गौरव यात्रेत अनेक प्रवाशांची प्रकृती अचानक बिघडली होती. ही बाब पुणे रेल्वे प्रशासनाला काळवण्यात आली होती. मध्यरात्री ही ट्रेन पुणे रेल्वे स्टेशनवर पोहोचली. तातडीने ससून रुग्णालयातील स्टाफ आणि डॉक्टर रेल्वे स्टेशनवर उपचारासाठी दाखल झाले. ४० प्रवाशांना प्राथमिक उपचार दिल्यानंतर प्रवाशांची प्रकृती स्थिर झाली. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासली नाही, अशी माहिती मिळाली आहे. या सर्व ४० प्रवाशांची प्रकृती आता स्थिर आहे. पण, अन्नातून ही विषबाधा झाल्याचा संशय व्यक्त केला आहे जात आहे. या बाबत अधिक तपास आता रेल्वे प्रशासन करत आहे.

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Back to top button