महाराष्ट्रमुख्य बातमीराजकारण

३ महिन्यांत खेळ पलटवणार

मुंबई : अजित पवार यांनी पक्ष सोडल्याच्या मुद्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पहिल्यांदाच उघडपणे बोलले. पवार म्हणाले की, मला सोडून पक्षातून गेलेले लोक यापूर्वीही निवडणुकीत पराभूत झाले आहेत. अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना अल्टिमेटम देताना शरद पवार म्हणाले की, माझ्याकडे अजून वेळ आहे. त्यांची इच्छा असेल तर ते पुन्हा पक्षात येऊ शकतात अन्यथा मी ३ महिन्यांत संपूर्ण खेळ पलटवून लावणार आहे.

बंडखोर आमदार पुन्हा राष्ट्रवादीत येण्याचा विचार करत असल्याचे शरद पवार यांनी सांगितले. अजित पवार गटातील अनेकांनी माझ्याशी फोनवरून चर्चा केली आहे. त्यांचा फक्त राष्ट्रवादीच्या विचारसरणीवर विश्वास असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे येत्या काही दिवसांत आमदार परतण्यावर अंतिम निर्णय घेऊ. अजित पवार यांनी पक्षातून बंडखोरी केल्याच्या या घटनेला त्यांचा आशीर्वाद आहे का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर शरद पवार म्हणाले की, ही शुद्र बाब असेल. हे फक्त कमी बुद्धीचे लोकच बोलू शकतात. मी राज्याव्यापी दौरा करणार आहे. कार्यकर्त्यांना प्रेरणा देईन. काही नेत्यांनी केलेल्या कृत्यामुळे कार्यकर्त्यांनी खचून जाऊ नये. बंडखोर आमदार पुन्हा पक्षात आले तर त्यांच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही, असे शरद पवार म्हणाले. आम्ही कोणत्याही व्यक्तीवर कोणतीही कारवाई करणार नाही. काही लोक वेगळ््या पद्धतीने वागले आहेत. मी कोणाशीही हेतूपूर्वक वाईट वागणारा व्यक्ती नाही, असेही त्यांनी सांगितले.

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button