महाराष्ट्रमुख्य बातमी
LIVE UPDATE ON MAHARASHTRA राज्यपालांनी उद्धव ठाकरेंना बहुमत चाचणी बोलावणं बेकायदेशीर
- नबाम रेबिया प्रकरणाचा विषय मोठ्या घटनापीठाकडे सोपवण्यात येत आहे – सुप्रीम कोर्टाचा निर्णय
- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी या प्रकरणात आपल्या विशेषाधिकाराचा जो वापर केला तो कायद्याप्रमाणे नव्हता – सुप्रीम कोर्ट
- तत्कालिन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर घटनापीठाचे ताशेरे, कोणत्याही पक्षात अंतर्गत दुफळी निर्माण झाली असली तरी राज्यपालांनी त्या राजकीय क्षेत्रात शिरकाव करणे, हे राज्यघटनेतील तरतुदींना अभिप्रेत नाही, घटनापीठाचे गंभीर निरीक्षण
- महाविकास आघाडी सरकारविरोधात विरोधी पक्षांनी अविश्वासाचा प्रस्तावही दिला नव्हता, उद्धव ठाकरे सरकारने विश्वास गमावला आहे की नाही, हे राज्यपालांनी आधी तपासायला हवे होते – सुप्रीम कोर्ट
- राज्यपालांपुढं बहुमत चाचणी बोलावण्यासारखी वस्तुनिष्ठ स्थिती नव्हती : सुप्रीम कोर्ट
- शिवसेनेत दोन गट पडलेले असताना आणि दोन व्हिप असताना विधानसभाध्यक्षांनी चौकशी करणे गरजेचे होते, पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या मान्यतेने कोण व्हिप आहे, हे विधानसभाध्यक्षांनी तपासायला हवे होते, घटनापीठाचे महत्त्वाचे निरीक्षण
- एकनाथ शिंदे यांच्या गटाचे भरत गोगावले यांना व्हिप म्हणून विधानसभाध्यक्षांनी मान्यता देणे बेकायदेशीर – सुप्रीम कोर्टाचा निर्णय
- महाराष्ट्राच्या निमित्ताने नबाम रेबिया प्रकरणाचा विषय आणखी मोठ्या पीठाकडे जाणार. घटनापीठाचा निर्णय…
- Maharashtra Political Crisis : नबाम रेबियाचं प्रकरण मोठ्या बेंचकडे जाणार
- सरन्यायाधीशांकडून सत्तासंघर्षाच्या निकालाचं वाचन
Advertisements
Advertisements
Follow Us