महाराष्ट्रव्हायरल बातम्या

दुर्दम्य इच्छाशक्तीपुढे नियतीने हार मानली

इंदापूर : जन्मानंतर अवघ्या एक ते दोन महिन्यापर्यंत जगेल असे भाकीत खुद्द डॉक्टरांनीच केले होते. मात्र ‘देव तारी त्याला कोण मारी’ या म्हणीचा प्रत्यय पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील भिगवण येथील जन्मजात अपंगत्व आलेल्या तनुजाकडे पाहिल्यावर येतो. तनुजा जन्माला आली तेव्हा ती अवघ्या एक ते दोन महिने जगेल असे भाकीत डॉक्टरांनी केले होते. कारण तिला जन्मजातच मणक्याचा संपूर्ण भाग नसल्याने ती चालू व बसू शकणार नव्हती. नियतीने तिचं जन्मतःच जगण्याचं बळ हिरावून घेण्याचा प्रयत्न केला खरा, पण तिच्या दुर्दम्य इच्छाशक्तीपुढे नियतीलाही हार मानवी लागली. ती जिंकली.. जन्मतःच चालण्याचं, स्वतः काही करण्याचं सगळं बळ गमावून बसलेली तनुजा आज भिगवणमधील एक आदर्श मुलगी बनली आहे.

दोन महिन्यांचं आयुष्य लाभेल, असे सांगितलेली तनुजा आज बारा वर्षांची झाली असून ती इयत्ता पाचवीत शिकत आहे. तनुजाला जन्मजात संपूर्ण मणक्याचा भाग नसला तरी ती वडीलांचा शुध्द पाण्याचा व्यवसाय ताठपणे सांभाळत आहे. या व्यवसायातून ती महिनाकाठी आठ ते दहा हजार रुपये मिळवून देते. आजार व अपंगत्वाला कंटाळून तसेच इतर कारणामुळे नैराश्य आलेले अनेक जण आत्महत्ये सारखे टोकाचे पाऊल उचलतात. पण इथे तनुजाचा आदर्श घेण्यासारखा आहे.

विशेष म्हणजे तिच्या माणुसकीच्या वागण्याने तिने साऱ्यांनाच आपलेसे केले आहे, सर्वजण तिच्याशी सहानुभूतीने वागतात आणि तीही आपल्या वाट्याचे दुःख विसरून अगदी सामान्य मुलांसारखेच व्यवसायाचा सारा व्यवहार पाहते. तनुजाची आई प्रतीक्षा,आजी शांता,आजोबा पंडित, बालमैत्रीण अपेक्षा गाडे तिचे खास आधार आहेत.

Advertisements
Advertisements

तनुजाचे वडील गणेश शेळके म्हणाले की, तिच्या जन्मावेळी मुलगी झाल्याचा खूप आनंद झाला मात्र नियतीने तिच्यापुढे एवढे काही वाढून ठेवले याची कल्पनाही आम्ही केली नव्हती. दोन वेगवेगळ्या तज्ज्ञ डॉक्टरांनी तिच्या आजाराविषयी माहिती दिली व ती अल्पायुषी असल्याचे सांगण्यात आले. मात्र नशिबावर विश्वास ठेवला आणि अखेर तिचे पाऊल आमच्या घरासाठी लक्ष्मी घेऊन आल्याचा अनुभव आम्ही घेत आहोत. घरात कोणतीही वस्तू आम्ही घेतली तर तिचे पाऊल त्या वस्तूवर उमटवतो. तिच्या आगमानने परिस्थिती बदलली आहे.

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button