देश -विदेशमहाराष्ट्रराजकारण

अजित पवारांनी राष्ट्रवादीसोबत का केलं बंड? ‘हे’ आहे कारण?

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे. शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीतही मोठी फूट पडणार असल्याची चर्चा असून अजित पवार हे राजभवनावर दाखल झाले आहेत. ते आपल्या विरोधीपक्षनेते पदाचा राजीनामा देणार असून शिंदे भाजप सरकारमध्ये दाखल होणार असल्याचं वृत्त टीव्ही ९ या वृत्तवाहिनीने दिली आहे.

दरम्यान, सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांना पक्षाचे कार्याध्यक्ष केल्यानंतर अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा होत्या. तर ते कधीही भाजपसोबत जाऊ शकतात असं सांगण्यात येत होतं. अजित पवार यांनी मला पक्षाची जबाबदारी द्या, विरोधीपक्षनेते पदावरून मला मुक्त करा असं राष्ट्रवादीच्या बैठकीत सांगितलं होतं. त्यासाठी अजित पवारांनी १ जुलै पर्यंत अल्टीमेटम दिलं होतं. पण पक्षाकडून कोणताही निर्णय घेण्यात आला नसल्यामुळे अजित पवार नाराज असून ते आता फडणवीस सरकारमध्ये सामील होणार आहेत.

अजित पवार यांना राष्ट्रवादीच्या ३० ते ४० आमदारांचा पाठिंबा असून त्यांच्यातील ९ मंत्री शपथ घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे सध्याच्या महाराष्ट्राच्या राजकारणातील ही सर्वांत मोठी अपडेट आहे.

Advertisements
Advertisements

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Back to top button