महाराष्ट्रराजकारण

भास्कर जाधवला गाडल्याशिवाय राहणार नाही- रामदास कदम

खेड : रविवार ( 19 मार्च ) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खेड येथील गोळीबार मैदान येथे जाहीर सभा होत आहे. त्या सभेचे जोरदार तयारी सुरू असल्याचे सांगत रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. रामदास कदम यांनी खेड येथे होणारी सभा ऐतिहासिक सभा होईल. आम्ही फक्त मतदार संघातील लोकांना बोलवणार आहे. अफझल खान कसा सगळं सैन्य घेऊन महाराष्ट्रावर चालून आला होता तसं संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांना उद्धव ठाकरे घेऊन आले होते. मातोश्रीवर जोरदार बैठका घेतल्या जात होत्या. प्रत्येकाला विचारलं जात होतं तू किती माणसं आणणार? त्यामुळे आमच्या सभेला त्यांच्यापेक्षा जास्त गर्दी राहील असा दावा कदम यांनी केला आहे.

उद्धव ठाकरे यांनी आम्हाला संपविण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. मला गुहागर येथे उद्धव ठाकरे यांनीच पाडले. मी तिथे गाफील राहिलो असे रामदास कदम यांनी सांगत भास्कर जाधव यांच्याविरोधात दंड थोपटले आहे. योगेश कदमला पाडण्यासाठी जोरदार प्रयत्न केले पण आम्ही पुरून उरलो.

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Back to top button