मुंबई : शिवसेनेत फूट पडून आता जवळपास वर्ष होत आले असून, या कालावधीत उद्धव ठाकरे यांच्या गटातील अनेक नगरसेवक व पदाधिकारी शिंदे यांच्या गटात येत आहेत. असे असताना आता त्यांच्याच पक्षातील कांदिवली, चारकोप, मालाडमधील पदाधिकाऱ्यांनी पत्र पाठवून राजीनामा देण्याचा इशारा दिला आहे. या पदाधिकाऱ्यांनी पत्रात शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांचे चिरंजीव आमदार सिद्धेश यांच्याविरोधात तक्रार केली आहे. ते पक्षात काम करू देत नसल्याचा आरोप या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
विशेष म्हणजे आरोप करणाऱ्यांची संख्या ही तब्बल ३० ते ४० इतकी आहे. ‘आम्ही तुमच्यासोबत आहोत, पण कदमांना समज द्या’, असेही त्यांनी या पत्रात म्हटले आहे. शिवसेनेत फूट पडून आता जवळपास वर्ष होत आले असून, या कालावधीत उद्धव ठाकरे यांच्या गटातील अनेक नगरसेवक व पदाधिकारी शिंदे यांच्या गटात येत आहेत. असे असताना आता त्यांच्याच पक्षातील कांदिवली, चारकोप, मालाडमधील पदाधिकाऱ्यांनी पत्र पाठवून राजीनामा देण्याचा इशारा दिला आहे.
या पदाधिकाऱ्यांनी पत्रात शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांचे चिरंजीव आमदार सिद्धेश यांच्याविरोधात तक्रार केली आहे. ते पक्षात काम करू देत नसल्याचा आरोप या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. विशेष म्हणजे आरोप करणाऱ्यांची संख्या ही तब्बल ३० ते ४० इतकी आहे. ‘आम्ही तुमच्यासोबत आहोत, पण कदमांना समज द्या’, असेही त्यांनी या पत्रात म्हटले आहे. चारकोप विधानसभा क्षेत्राचे प्रमुख संजय सावंत म्हणाले की, ‘कांदिवली, चारकोप विधानसभा या भागातील आम्ही सर्व वरिष्ठ पदाधिकारी एकत्रितपणे सामूहिक राजीनामा देण्याच्या तयारीत आहोत. सिद्धेश कदम यांचा हस्तक्षेप आणि गटबाजीला कंटाळून आम्ही हा निर्णय घेतला आहे. एकनाथ शिंदे यांना भेटल्यानंतर पक्षात जी गटबाजी चालली आहे याबाबत निश्चित माहिती देऊ.’