मुंबई : मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी ‘बार्टी’मार्फत राबविण्यात येणाऱ्या कौशल्य प्रशिक्षण केंद्र सुलभपणे सुरु करण्याबाबत आणि त्यावरुन विचारलेल्या प्रश्नांना समाधानकारक उत्तर न दिल्याने भाजप आमदार आशिष शेलार आणि राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी मंत्री शंभुराज देसाई यांना खिंडीत गाठले. समाधानकारक उत्तर न देणाऱ्या शंभूराज देसाई यांना धारेवर धरत शेलार आणि जयंत पाटलांनी मंत्री देसाई यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करत त्यांना अडचणीत आणलं. दुसरीकडे संयमी बाळासाहेब थोरात यांनीही सरकारी पक्षाला खडसावत मंत्री गंभीरपणे उत्तरे देत नसल्याचं म्हणत त्यांना जरा अभ्यास करायला लावा, अशी कडक सूचना केली.
राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा आहे. दरम्यान, प्रश्नोत्तराच्या तासाला ‘बार्टी’च्या प्रश्नावरुन भाजप आमदार आशिष शेलार आणि राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटलांनी मंत्री शंभूराज देसाई यांची शाळा घेतली. शंभूराज देसाई यांनी हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याचं सांगितल्याने जयंत पाटील आणि आशिष शेलार दोघेही देसाई यांच्यावर भडकले.
राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा आहे. दरम्यान, प्रश्नोत्तराच्या तासाला ‘बार्टी’च्या प्रश्नावरुन भाजप आमदार आशिष शेलार आणि राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटलांनी मंत्री शंभूराज देसाई यांची शाळा घेतली. शंभूराज देसाई यांनी हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याचं सांगितल्याने जयंत पाटील आणि आशिष शेलार दोघेही देसाई यांच्यावर भडकले.
राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा आहे. दरम्यान, प्रश्नोत्तराच्या तासाला ‘बार्टी’च्या प्रश्नावरुन भाजप आमदार आशिष शेलार आणि राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटलांनी मंत्री शंभूराज देसाई यांची शाळा घेतली. शंभूराज देसाई यांनी हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याचं सांगितल्याने जयंत पाटील आणि आशिष शेलार दोघेही देसाई यांच्यावर भडकले.
शंभूराज देसाई यांच्या प्रश्नावर जयंत पाटील यांनी हरकत घेतली. ते म्हणाले, “बार्टीच्या प्रश्नावर कोणतंही उत्तर न देता न्यायालयात याचिका आहे, त्यावर सुनावणी सुरु आहे, असं उत्तर आपण दिलंत. पण ५ वर्षांचा कालबद्ध कार्यक्रम आखून दिला, हे खरंय का? या प्रश्नावर सरकार उत्तर देत नाही. ४ मे रोजी २० हजार विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याचं निदर्शनास आले आहे? यावरही सरकारकडे कोणतंही उत्तर नाही. दुर्लक्षित करणाऱ्या अधिकाऱ्यांवर सरकार कोणती कारवाई करणार आहे वा केली? यावरही सरकारकडे कोणतंही उत्तरं नाही. सरकार काय म्हणतंय, १-२-३ या प्रश्नांवर याचिका आहे. सुनावणी सुरु आहे. सदर प्रकरणी राज्याचे महाधिवक्ता बाजू मांडत असून प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. प्रश्न वेगळे आहेत. सरकारने याचं उत्तर कोर्टात नेवून ठेवलंय. आमच्या प्रश्नांना मंत्रीमहोदयांनी उत्तर दिलेलं नाही. म्हणून हा प्रश्न राखून ठेवावा” अशी मागणीच जयंत पाटील यांनी केली.