नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे तातडीने पंचनामे करा. असा आदेशही त्यांनी यावेळी दिला. तसेच, सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. अशी ग्वाहीदेखील मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.
हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार वाशीम जिल्ह्यात रात्री वाशीमसह कारंजा, मानोरा, रिसोड आणि तालुक्यातील अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला आहे. या अवकाळी पावसामुळे रब्बीतील काढणीला आलेल्या गहू, हरभरा, पिकांसह भाजीपाला आणि संत्रा बागेच अतोनात नुकसान झाले आहे.
Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements
Follow Us