परभणीमुख्य बातमी

अखंड हरिनाम सप्ताहाच्या प्रसादातून विषबाधा

भगर खाल्ल्याने ४०० ग्रामस्थांची प्रकृती बिघडली

परभणी: परभणी तालुक्यातील माळसोन्ना गावामध्ये मंगळवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये एकादशी असल्याने भाविकांना भगरीचे वाटप प्रसाद म्हणून करण्यात आले. ही भगर खाल्ल्यानंतर काही वेळाने अनेकांना उलटी, जुलाब, चक्कर येणे असे प्रकार सुरू झाले. पाहता पाहता हा त्रास अनेकांना होऊ लागला. त्यामुळे ग्रामस्थांनी तसेच भाविकांनी उपचारासाठी परभणी गाठली. रात्री अकरा वाजेपर्यंत कॅज्युलटीमध्ये रुग्णांची उपचारासाठी गर्दी सुरूच होती. साधारण ४०० पेक्षा अधिक जणांना ही विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती आरोग्य यंत्रणेतील सूत्रांनी दिली.

परभणी तालुक्यातील ब्राह्मणगाव जवळ माळसोन्ना गाव आहे. या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे. या सप्ताहात मंगळवारी एकादशी असल्याने सायंकाळी साडेपाच वाजता कथा समाप्तीनंतर उपस्थित भाविकांना भगरीचे वाटप करण्यात आले. गावातील महिला, लहान मुले आणि भाविकांनी सायंकाळी साडेपाच ते सहाच्या दरम्यान ही भगर खाल्ली. अनेकांना साडेसात ते आठच्या दरम्यान रात्री उलटी, जुलाब त्रास सुरू झाला. त्यानंतर ज्यांना त्रास होत आहे, असे रुग्ण थेट परभणीमध्ये दाखल झाले. यात जिल्हा रुग्णालयाच्या बाह्य रुग्ण कक्षामध्ये अनेकांवर उपचार करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत रुग्ण दाखल होत होते.

रुग्णांच्या प्रकृती प्रमाणे त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी स्थलांतरित करून उपचार केले जात होते. याशिवाय, परभणी शहरातील काही खाजगी दवाखान्यात सुद्धा अनेक रुग्णांनी धाव घेतली. जिल्हा आरोग्य यंत्रणेतील शिवाय खाजगी रुग्णवाहिका या गावातील रुग्णांना आणण्यास माळसोन्ना येथे गेल्या होत्या. हा रुग्णांचा आकडा अंदाजे ४०० हून अधिक असल्याचे काही ग्रामस्थांनी सांगितले. विशेष करून यामध्ये महिला, मुलांचा समावेश आहे. यात कोणीही गंभीर नाही, मात्र, रुग्ण संख्या वाढतच आहे.

Advertisements
Advertisements

दरम्यान, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे आणि पोलिस अधीक्षक यांनी सोन्ना गावात जाऊन रुग्णांची भेट घेऊन माहिती घेतली. जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा रुग्णालयात जाऊन आढावा घेतला. तसेच, योग्य ते उपचार करण्याचे आरोग्य विभागाला आदेश दिले.

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Back to top button