देश -विदेशराजकारण

अख्खा देव एका व्यक्तीनं ताब्यात घेतला; मल्लिकार्जुन खरगेंचा पीएम मोदींवर कडाडून हल्लाबोल

अयोध्येत उद्या सोमवारी (22 जानेवारी) होणाऱ्या रामलला प्राण प्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. आसाममधील नागाव येथे एका सभेला संबोधित करताना ते म्हणाले की, एका व्यक्तीने संपूर्ण देव ताब्यात घेतला आहे. ते म्हणाले की, “पंतप्रधान मोदी राम मंदिरात आहेत आणि रामदेव बाहेर आहेत. सर्व महत्त्वाचे लोक बाहेर आहेत. त्यांना (पीएम मोदी) सर्व काही एकट्याने करायचे आहे. तुम्ही एकटेच सर्वकाही करत असाल तर इतरांकडे मते का मागता? अशी विचारणा त्यांनी केली.

हिमंता बिस्वा सरमा धर्मांतरित मुख्यमंत्री

यावेळी त्यांनी मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यावर राजकीय निशाणा साधला आणि त्यांना धर्मांतरित मुख्यमंत्री म्हटले. ते म्हणाले की, “आसाममध्ये जो आम्हाला सोडून भाजपमध्ये आला तो ‘नवा धर्मांतरित मुख्यमंत्री’ आहे. तो आम्हाला धमक्या देत आहे. भाजपच्या लोकांनी यात्रेवरही हल्ला केला, वाहनांच्या काचा फोडल्या आणि पोस्टर्स आणि बॅनर फाडले.”

देशातील सर्वात भ्रष्ट मुख्यमंत्री

काँग्रेस अध्यक्ष म्हणाले की, “येथील (आसाम) मुख्यमंत्री हे विसरतात की त्यांच्यावरच असंख्य घोटाळ्यांचे आरोप आहेत, त्यांच्यावर अनेक कलमांतर्गत गुन्हे दाखल आहेत. आसामचे मुख्यमंत्री हे देशातील सर्वात भ्रष्ट मुख्यमंत्री आहेत, असे राहुल गांधी बरोबर म्हणाले. ते सत्य आहे आणि जर ते स्वच्छ होत असतील तर त्यामागे फक्त मोदी आणि अमित शहा यांच्या वॉशिंग मशीनचे आश्चर्य आहे.

Advertisements
Advertisements

आम्ही इंग्रजांना घाबरलो नाही

भारत जोडो न्याय यात्रेवर झालेल्या हल्ल्याबाबत खरगे म्हणाले की, भाजपचे लोक राहुल गांधींच्या दौऱ्याला घाबरले आहेत. हे लोक जयराम रमेश यांच्या वाहनावर हल्ला करत आहेत, पण ते काँग्रेसचे सैनिक आहेत. ते घाबरत नाहीत. आमचे लोक तुरुंगात गेले. आम्ही इंग्रजांना घाबरत नाही तर भाजपला का घाबरणार?

त्यांनी सांगितले की, राहुल गांधी कन्याकुमारी ते काश्मीरला जात असताना दगडफेक झाली नाही. त्यावेळी लाखोंच्या संख्येने लोक मिरवणुकीत सहभागी झाले होते, पण आसाममध्ये हल्ला का झाला?, पंतप्रधान मोदींचे शिष्य असल्यामुळे येथे हल्ला होत आहे. तो अल्पसंख्याकांना धमकावतो. आज या देशात भाजपला प्रत्येक राज्यात दिल्लीतून सरकार चालवायचे आहे आणि एक देश, एक निवडणूक, एक विचारधारा लादायची आहे.

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Back to top button