छत्रपती संभाजीनगरच्या नामांतराविरोधात जलील आंदोलन करत आहेत. यावर भाजप आणि शिंदे गटाकडून टीका केली जात आहे. शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी इम्तियाज जलील यांचं आंदोलन नाही तर बिर्याणी पार्टी आहे, तसेच औरंगजेबाची कबर औरंगाबादमधून हटवा अशी मागणी केली आहे. यानंतर जलील यांनी आम्हाला औरंगजेबाशी काही घेणं देणं नाही, त्याचा आमचा काही संबंध नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे.
वृत्तानुसार खासदार जलील यांनी आम्हाला औरंगजेबाशी काही घेणं देणं नाही, त्याचा आमचा काही संबंध नाही. जसं शहराचं नामांतर आमच्यावर लादलं तसा औरंगजेब आमच्यावर का लादता? असा प्रश्न देखील विचारला आहे.
औरंगजेबाची कबर जिथे हलवायची तिथे हलवा, आम्हाला विचारताय की सांगताय हे कळायला मार्ग नाही आणि जर आमची परवानगी हवी असेल तर त्याचं एक पत्र घेऊन या, मग आम्ही बघू परवानगी द्यायची की नाही, असा टोलाही जलील यांनी लागावला.
Advertisements
Advertisements
Follow Us