परभणी : वारंवार निवेदन देवूनही पिकांच्या नुकसानीचे पंचनामे होत नसल्याने संतप्त मानवत येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेना व संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी परभणी शहरातील उघडा महादेव परीसरात असलेल्या खाजगी विमा कंपनीच्या कार्यालयात तोडफोड केली. तसेच यावेळी अधिका-याला काळे फासण्याचा प्रयत्न केला परंतू अधिका-याने पळ काढून स्वत:ची सुटका करून घेतली.
मानवत तालुक्यात मागील २१ दिवसांपासून पावसाचा खंड पडला आहे. त्यामुळे उगवलेली पिके करपण्याच्या मार्गावर आहेत. पावसाअभावी शेतकरी धास्तावला असून आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यामुळे शेतपिकांचे पंचनामे करण्यात यावेत अशी मागणी संभाजी ब्रिगेड व मनसे कार्यकर्त्यांनी आयसीआयसीआय लोंबार्ड विमा कंपनी व जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली होती. याच मागणीसाठी संभाजी ब्रिगेड व मनसे पदाधिका-यांनी १० ऑगस्ट रोजी पिकविमा कार्यालयात जावून घेराव आंदोलन केले होते.
परभणी : वारंवार निवेदन देवूनही पिकांच्या नुकसानीचे पंचनामे होत नसल्याने संतप्त मानवत येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेना व संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी परभणी शहरातील उघडा महादेव परीसरात असलेल्या खाजगी विमा कंपनीच्या कार्यालयात तोडफोड केली. तसेच यावेळी अधिका-याला काळे फासण्याचा प्रयत्न केला परंतू अधिका-याने पळ काढून स्वत:ची सुटका करून घेतली.
मानवत तालुक्यात मागील २१ दिवसांपासून पावसाचा खंड पडला आहे. त्यामुळे उगवलेली पिके करपण्याच्या मार्गावर आहेत. पावसाअभावी शेतकरी धास्तावला असून आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यामुळे शेतपिकांचे पंचनामे करण्यात यावेत अशी मागणी संभाजी ब्रिगेड व मनसे कार्यकर्त्यांनी आयसीआयसीआय लोंबार्ड विमा कंपनी व जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली होती. याच मागणीसाठी संभाजी ब्रिगेड व मनसे पदाधिका-यांनी १० ऑगस्ट रोजी पिकविमा कार्यालयात जावून घेराव आंदोलन केले होते.